Krishi Desh

Rebuilding Bharat, A Journey

Archive for the ‘Marathi’ Category

Marathi posts.

पाण्याचा दुख:काळ का पडतो? तुटवडा का निर्माण होतो?

Posted by संदीप नारायण शेळके on April 11, 2013


ह्या प्रश्नावर मी गेली कित्येक दिवस विचार करीत आहे. आणि त्यातून मला समजलेली काही कारणे. निश्चितच मी इथे जी करणे नमूद केली आहेत त्यामध्ये अजून सुधारणा होऊ शकतात.

गैरवापर:

  • बेहिशोबी आणि बेजबाबदार पिक व्यवस्थापन

  • नदी पात्रांमधील, ओढे-नाल्यावरील अतिक्रमण

  • बेसुमार वाळू उपसा आणि तस्करी.

  • अवैध जंगलतोड

  • वाढते प्रदूषण

  • बंधारे आणि जलाशयांचा बेसुमार आणि अनिर्बंध वापर

  • जमिनीखालील पाण्याचा बेसुमार उपसा

नियोजनाचा अभाव:

  • पावसाच्या पाण्याचे ढिसाळ नियोजन आणि संधारणाविषयीची उदासीनता

  • शेतामधील नष्ट होणारे बांध आणि त्यामुळे नाश पावणारी वनराई

  • सुमार वृक्ष लागवड व संवर्धनाच्या नावाने असणारी बोम्ब

  • अनियमित आणि अनिर्बंध शहरीकरण

  • वाढत्या कुपनलिका/ट्यूबवेल/बोअरवेल

दुर्लक्ष:

  • पाण्याच्या वाहतुकीमध्ये होणारी गळती

  • दुषित पाणी, मल विना प्रक्रिया नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडणे

  • मोठाले धरणं बांधून पाण्याच्या जाणीवपूर्वक वापराकडे होत असलेले दुर्लक्ष

  • सूक्ष्म आणि मध्यम जलाशयांकडे होत असलेले अघोरी दुर्लक्ष

  • जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष

परंतु अजून खोल विचार केल्यावर लक्षात आले कि हि तर फक्त लक्षणं आहेत खरे कारण तर “नेत्तृत्त्वाचा अभाव आणि स्वधर्माचा पडलेला विसर” आहे.

जय भारत!

Posted in Agriculture of Bharat, Marathi, Thoughts | Tagged: , | Leave a Comment »

नेहमीची येतो दुष्काळ (Draught is routine)

Posted by संदीप नारायण शेळके on February 28, 2013


“नेहमीची येतो पावसाळा” तसे आता “नेहमीची येतो दुष्काळ” असे म्हणायची वेळ आली आहे.

दर ३-४ वर्षांनी एक लहानसा दुष्काळ आणि दर १०-१२ वर्षांनी एक भयावह दुष्काळ, हे असे दुष्टचक्र प्रस्थापित होत आहे. बरं, अशा वेळी सरकार, विरोधक अथवा अन्य कोणाला दोष देऊन उपयोग होत नाही. कारण पाण्याची कमतरता भरून काढणे खिशातून नोटा काढण्याएवढे सोपे नाही. अर्थातच सरकारी दूरदृष्टीचा आणि आत्मीयतेचा अभाव हि गंभीर बाब आहे. परंतु ह्यामध्ये जनतेची, म्हणजेच आपली, काहीच चूक नाही का?

सोपे उदाहरण घ्या,

पूर्वी प्रत्येक शेताला मोठाल्या ताली घातलेल्या असायच्या. आता कुठे आहेत. १ फुटाचा बांध सुद्धा नको वाटतो. अजून बघायचे झाले तर बांधावरील झाडे. संपूर्णपणे गायब झाले आहेत. का? का तर त्यामुळे शेतात ओसावा पडतो. किती क्षेत्र? अगदी नगण्य असे. परंतु असा दुष्काळ पडल्यावर किती क्षेत्र रिकामे पडते? गावांची अवस्था मसनवटयापेक्षा भयानक आहे. रस्त्याच्या कडेला झाडे नाहीत, त्यामुळे पावसाने पडणारे पाणी वाहून तर जातेच पण सोबतच मातीही जाते. शेतांची अवस्था काही वेगळी नाही.

बरं आमच्यासारखा काही बोलला तर त्याला सरळ सुनावले जाते “तुम्हाला काय कळते त्यातले. आमचे अवघे आयुष्य गेले ह्याच्यात. पावसापुढे कोणाचे काही चालत नाही. सरकारने धरणाचे पाणी दिले पाहिजे.”

ह्या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे:
प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव व्हायला पाहिजे.

सरकारने नक्कीच सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे परंतु नागरिकांचा त्याला प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे.

जय भारत!

Posted in Activity, Marathi, Politics in Agriculture, Thoughts | Tagged: , , , | Leave a Comment »

शिवाजी – सेर सिवराज है

Posted by संदीप नारायण शेळके on February 20, 2013


“छत्रपति शिवाजी महाराज”

इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब परShivaji Maharaj
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||
-कविराज भूषण

जय भारत!

स्रोत श्री नितीन बानगुडे पाटील

Posted in Marathi, Poem, Shivaji Maharaj | Tagged: , , , , , , | Leave a Comment »

Uddhav Thakare, please work for empowerment, freedom, opportunity.

Posted by संदीप नारायण शेळके on February 4, 2013


image

This is really sickness. They start demanding freebies whenever there is any disaster. But no contingency plan. No plan in place to empower farmers, to make them self dependent.

Lets stop this non sense once. Uddhav Thakare, I don’t support such naive demands. Every time demanding waivers, subsidies sound like beggar than self-respecting human. Where are the real demands for freedom, freedom of expression, freedom of movement, equal opportunity etc..

Jay Bharat!

Posted in Agriculture of Bharat, Bharat, Entrepreneurship, Marathi, Politics, Politics in Agriculture, Thoughts | Tagged: , , , , | Leave a Comment »

पंतप्रधानांसाठी जाहीर पत्र (रक्षकच बनले भक्षक)

Posted by संदीप नारायण शेळके on January 24, 2013


Read in English

प्रती,
कॉंग्रेस प्रणीत केंद्र सरकार,
भारत.

मा. पंतप्रधान महोदय,

गेल्या काही वर्षांमधील घटना आणि त्यावर तुमच्या सरकारच्या आणि परिणामी तुमच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर असे दिसते कि तुम्हाला तुमच्या कामाचा विसर पडला आहे. त्या मुलभूत कामांची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी, हा खटाटोप.

तुम्हाला ठरवून दिलेली मुख्य कामे:
१. नागरिकांचे व्यक्ती, संचार आणि व्यवसाय स्वातंत्र्य अबाधित राखणे
२. सर्वांना समान न्याय मिळवून देणे
३. अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून जीवन आणि मालमत्तेची सुरक्षा करणे
४. समान संधी (त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास) मिळवून देणे
ह्यासोबतच, प्रत्येक पै-न-पै चा हिशेब देणे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.

वर ठरवून दिलेली कामे इमाने-इतबारे करण्याची शपथ घेतलेली असताना, खेदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही ह्यातील एकही गोष्ट देऊ/पाळू शकला नाहीत. ह्याची नमुनादाखल खाली काही उदाहरणे दिली आहेत. क्रमशः

१. मागे एका व्यंग चित्रकाराने चित्र काढले म्हणून तुमच्याच कुठल्यातरी नियमानुसार त्याला अटक केली, अटक करणाऱ्यांवर काहीच कारवाई नाही.
२. महाराष्ट्र आणि आसाम मध्ये दुसऱ्या राज्यांमधून आलेल्या नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेचे नुकसान झाले, कोणावर काहीच कारवाई नाही.
३. समान न्याय दूरच राहिला परंतु देशाची संपत्ती लुटून भ्रष्टाचार करणाऱ्या तुमच्याच सहकाऱ्यांना साधे निलंबित सुद्धा केले नाही.
४. राजधानी सहित संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचार, लुटमार आदींची परिसीमा झालेली असताना तुमच्याकडून काय पाऊल उचलले गेले? काहीच नाही याउलट, नको त्या विषयांवरून तुमच्या सहकाऱ्यांनी प्रसार माध्यमांमधून गदारोळ उठवून देशात अशांतंता निर्माण करण्याचे प्रयत्न केले.
५. सीमारेषा ओलांडून येउन काही दहशतवाद्यांनी देशाला वेठीस धरले, तुम्ही काय केले? तर त्या देशासोबत क्रिकेटच्या माध्यमातून चर्चा वाढवली.
६. एवढेच नाही तर त्या देशाने आपल्या सैनिकांना शांतंता रेषेजवळ अमानवीय रीतीने छळ करून मारले आणि एका सैनिकाचे शीर पळविले. तुमच्या सहकाऱ्यांनी देशप्रेमाच्या नावाखाली अतिरेक करू नका असे आम्हालाच सुनावले. एवढ्यावर न थांबता देशाला विरोधी पक्षापासून जास्त धोका आहे असे जाहीर प्रकटन करायला सुरुवात केली.
७. अशा परिस्थितीमध्ये गृहमंत्र्यांनी देशाची चिंता करायची सोडून बेछूट आणि बिन-बुडाचे युक्तिवाद सुरु केले कि ‘हिंदू दहशतवाद’ फोफावला आहे. खरच का? तसे असते तर ८०% हिंदू जनतेने जगभर हाहाकार माजवला असता. जगातील सर्वात सृजनशील आणि सहिष्णू समाजालाच दुषणे लावायला सुरुवात केली.
८. आम्हाला ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना काही शहरांमधून पाण्याचा भल्या मोठ्या प्रमाणावर अपव्यय होताना दिसतो. तुम्ही काय पाऊले उचलली?
९. सर्वसाधारण गरीब जनतेला दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. तुम्ही काय केले? प्रत्येक वेळी एक नवीन योजना काढून भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले. आणि नंतर रीतसरपणे विसरून जाता किंवा दुर्लक्ष करता.
१०. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, हिशोब मागितला तर तुम्ही आम्हाला अटक करता नाही तर आयकर विभागाकडून तपासाचा ससेमिरा नाहक मागे लावता. असे डूख धरून सूड बुद्धीने काम करायला आणि भाऊ-बंधकी निभवायला तुमची निवड केलीय का?
११. एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या विरोधी बाजू घेतली; म्हणून, तुमच्याच कोण्या एका सहकाऱ्याने पोलिसांकडून त्या वकिलाच्या भावाला शनिवारी मध्यरात्री अटक केली आणि तुरुंगात बेदम मारहाण केली.

एवढे सगळे झाल्यावर, इतक्या सगळ्या चुका केल्यावर तुम्हाला हे काम करण्याची अजूनही संधी का द्यावी? संविधान आणि नागरिकाच्या सार्वभौमत्त्वाचा अनादर केला म्हणून तुमच्यावर अविश्वास ठराव का ठेवू नये?

आणि हो हे पत्र वाचल्यावर हा कोण, मला माझे काम सांगणारा? असा विचार चुकुनही करू नका कारण, मी, तुमचा मालक, ह्या देशाचा सार्वभौम नागरिक आहे.

जय भारत!
- एक जागसुक नागरिक.

Posted in Bharat, Marathi, Politics, Thoughts | Tagged: , , , | Leave a Comment »

सौर उर्जा जागृती अभियान

Posted by संदीप नारायण शेळके on November 3, 2012


 

सौर उर्जा जागृती अभियान

सौर उर्जा जागृती अभियान

Posted in Activity, Bharat, Marathi | Tagged: , , | 1 Comment »

स्वदेशीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक विनम्र आवाहन

Posted by संदीप नारायण शेळके on October 21, 2012


Read in English

मला स्वदेशी चळवळीतील सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांना एक विनम्र आवाहन करायचे आहे. आता वेळ आली आहे कि हा लढा केवळ भावनिक न राहता खुल्या बाजारात (श्रेष्ठ दर्जा आणि वाजवी दर असलेला माल) स्पर्धात्मक आव्हानाच्या रूपाने उभा करावा. कारण केवळ भावनात्मक आवाहन स्वदेशाच्या भरभराटीस चालना देण्याऐवजी चळवळीच्या अस्तित्त्वावरच संकट निर्माण करू शकते. भावना ना तर आर्थिक घडामोडींची जागा घेऊ शकतात नाही मुलभूत गरजा भागवू शकत त्या केवळ आपले लक्ष विचलित करू शकतात. एवढेच नाही तर स्वदेशी चळवळीचा उद्देश हा परकीय मालाला विरोध नाही तर स्वदेशी मालाची विक्री आणि व्यवसाय वाढविणे हाच अपेक्षित आहे.

जर स्वदेशी माल श्रेष्ठ दर्जाचा आणि वाजवी किंमतीचा असेल  तर मला स्वतःला देखील स्वदेशी माल खरेदी कायला आवडेल. मुळातच उच्च दर्जाची आणि वाजवी किमतीची कुठलीही वस्तू विकत घेणे अथवा निवडणे हा ग्राहकाचा मुलभूत अधिकार आहे. आणि त्यातच भारतीय ग्राहक चोखंदळ आहे हे काही वेगळे सांगायला नको. म्हणून, जर चार पैसे वाचणार असतील ते वाचवावेत ह्या मताचा मी आहे. स्वदेशी माल जर गुणात्मक दृष्ट्या चांगला आणि तोडीस तोड स्पर्धा करणारा असेल तर तो परदेशी मालापेक्षा जास्त यशस्वी होईल कारण त्यावेळी अशा मालाला एक वैशिष्ठ्य असेल ते म्हणजे तो “स्वदेशी” आहे. आणि हे साध्य करायचे असेल तर चाणक्यांनी जवळपास २४०० वर्षांपूर्वी सांगितलेले मुक्त बाजाराचे आणि आर्थिक विचारांची शिदोरी यथायोग्य वापरणे क्रमप्राप्त आहे.

पतंजली आयुर्वेद ह्या संस्थेने स्वदेशी मालाचा नुसताच भावनिक मुद्दा ना करता वाजवी दराची गुणात्मक उत्पादनांची निर्मिती करून स्वदेशी मालाला प्रोत्साहन दिले. आणि ह्यामुळेच त्यांनी देशातील आणि विदेशातील मोठ्या संस्थांना एक आव्हान उभे केले आहे. परंतु ह्याच वेळी चाणक्यांनी वेळोवेळी प्रतिपादित केली गोष्ट म्हणजे “नफा वाईट नसतो” ह्याचा विसर पडता कामा नये. अन्यथा कुठलाच आर्थिक उपक्रम दीर्घ काळ टिकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
केवळ निष्क्रिय विरोध आपल्याला उत्कर्षाकडे घेऊन न जाता स्वयं ऱ्हास आणि तिसरे-जग हा दर्जा अखंड ठेवायला मदतच होईल. आणि मला वाटते कि स्वदेशी चळवळीचा असा उद्देश्य नक्कीच नाही, बरोबर? आपल्याला भरभराट, पूरक संधी आणि योग्य स्पर्धा ह्यांची निकडीची आवश्यकता आहे जेणेकरून आपण हे सिद्ध करू शकू कि आमच्या पूर्वजांनी जे वैभव कमावले होते ते आम्ही परत मिळवू शकतो.

होय मला खात्री आहे कि आपण पुन्हा एकदा जगातील सर्वात कार्यक्षम आणि श्रीमंत देश हे बिरुद मिरवू शकतो फक्त आपल्याला जे ज्ञान वंशपरंपरेने प्राप्त आहे ते स्वीकारण्याची आणि वापरण्याची आवश्यकता आहे. आपल्याला चाणक्यांनी जे धोरणं वापरली तेच धोरणं आधुनिक युगाशी जुळवत स्वीकारायचे आहेत. चाणक्यांच्या ह्याच सुत्रांमुळे इतिहासातील बलाढ्य, बलशाली आणि संपन्न भारताची स्थापना शक्य झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून १७व्या शतकापर्यंत जगातील एकूण उत्पन्नाच्या २५% वाटा हा भारताचा होता. आणि आज आपला वाटा केवळ ५% इतका उरला आहे. आपणाला गेल्या ४-५ शतकांमध्ये ज्या समाजवाद नावाच्या अशास्त्रीय आणि निसर्ग विरोधी रोगाची लागण झाली आहे त्यापासून मुक्त होणे आत्यावश्यक आहे.

जय भारत!

Posted in Bharat, Marathi, Politics, Rashtrabhakti (Patriotism), Thoughts | Tagged: , , , , , | Leave a Comment »

कृषी नियतकालिकं यादी

Posted by संदीप नारायण शेळके on October 17, 2012


अ.क्रं. नियतकालिक संपर्क क्रमांक शहर पत्ता संकेतस्थळ
दैनिक
अग्रोवन ०२३०-२४६८३८३/८४ कोल्हापूर सकाळ पेपर्स मर्या, डी४, एमआयडीसी,
शिरोली, कोल्हापूर – ४१६१२२
http://www.agrowon.com/Agrowon/index.htm
मासिक
लोकराज्य ०२२-२२८८२८८८ मुंबई माहिती व जनसंपर्क महा संचालनालय,
नवीन प्रशासन भवन, मुंबई – ३२
http://apps.dgipr.maharashtra.gov.in/lokrajya/termsncondition.aspx
http://dgipr.maharashtra.gov.in/main.aspx
आरसीएफ पत्रिका ०२२-२५५२३०७२/७३ मुंबई आरसीएफ, प्रियदर्शनी, आठवा मजला, सीआरएम
विभाग, पश्चिम एक्ष्प्रेस, सायन, मुंबई – २२
http://www.rcfltd.com/index.php/products/rcf-sheti-patrika
योजना ०२२-२७५६६५८२ नवी मुंबई बी विंग, केंद्रीय सदन, सेक्टर क्रमांक १०,
सीबीडी बेलापूर, नवी मुंबई–१४
http://yojana.gov.in/hindi/default.asp
शेतकरी ०२०-२५५३७३३१ पुणे कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य कृषीभवन,
दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे – ०५
http://mahaagri.gov.in/Publications/Shetkari.aspx
कृषीपणन ०२०-२४२६११९०/८२९७ पुणे महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ पुणे,
प्लॉट आर७, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे – ३७
अन्नदाता ०८४१५-२४६५५५ हैदराबाद युकेएमएल इमारत, दुसरा मजला,
रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद – ५०१५१२
आदर्शगाव ०२०-२५५३७८६६ पुणे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती,
कृषीभवन, शिवाजीनगर, पुणे-५
धान्यलक्ष्मी ०२४०-२३२८३३८ औरंगाबाद श्री राजलक्ष्मी प्रकाशन, ६, विपुल अपा,
अपेक्स रुग्णालय, गादिया पार्क, औरंगाबाद
१० शरद कृषी ०२०-२५३३१२२ पुणे अ३, गुरुकृपा अपा, न.ता. वाडी,
शिवाजीनगर, पुणे – ५
http://www.citaworld.org
११ शेतीप्रगती ०२३१-६४५४३२५ कोल्हापूर तेजस प्रकाशन, ट्रेड सेंटर, स्टे. रोड,
नवी शाहूपुरी, कोल्हापूर – ४१६००१
http://shetipragati.blogspot.in
१२ उद्योजकता ०२४०-२३६१२२३ औरंगाबाद महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अ३८,
एमआयडीसी, स्टे जवळ, औरंगाबाद – ५
http://mced.nic.in/Udyojak_Menu/eUdyojakSubscription.aspx
१३ कृषी व्यासपीठ ०२०-२४४५२९३१ पुणे ४२८/क, मराठे पेलेस, शनिवार पेठ, पुणे – ३०
१४ बळीराजा ०२०-२४४७३२२५
/५२५४०
पुणे बळीराजा कृषी विज्ञान प्रकाशन,१३८४,
शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे – २
१५ महिला विकास ०२४१-३०९०५३३/
९३२५१०७००५
अहमदनगर महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ, आव्हाड इमारत,
ओबेरॉय हॉटेल समोर, सावेडी रोड, अहमदनगर-८
१६ किसान शक्ती ०२३१-२६९२१७१/
९४२२५१३९४६
कोल्हापूर १४०३इ, शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर – ८ http://supplyindia.in/KISANSHAKTI8494
१७ गोडवा ०२०-२४४४८८५५४/५५/
९४२२०८३०९५
पुणे ५, तिसरा मजला, लक्ष्मीनारायण अपा,
लक्ष्मीनारायण थेटर जवळ, स्वारगेट, पुणे – ९
त्रैमासिक
१८ श्री सुगी ०२४२६-२४३३७६ राहुरी जन संपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषी
विद्यापीठ, राहुरी, जिल्हा. अहमदनगर
http://mpkv.mah.nic.in/EXTNEDU.HTM
१९ सिंचन पुणे महाराष्ट्र सिंचन विकास पाटबंधारे संशोधन व
विकास संचालनालय, ८ मोलेदिना रोड, पुणे-१
२० महाबीज वार्ता ०७२४-२२५९११६ अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या.,
महाबीज भवन, कृषीनगर, अकोला-४४४१०४
२१ इंडिअन होर्टीकल्चर ०११-२५८४३६५७ नवी दिल्ली इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च,
कृषी अनुसंधान भवन, पुसा, नवी दिल्ली-११००१२
http://www.icar.org.in/node/217
वार्षिक
२२ कृषीदर्शनी ०२४२६-२४३३७६ राहुरी जन संपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषी
विद्यापीठ, राहुरी, जिल्हा. अहमदनगर
http://mahaagri.gov.in/level3detaildisp.aspx?id=8&subid=7&sub2id=3

Posted in Agriculture of Bharat, Bharat, Marathi | Tagged: , , , , , , , , , , , , , , , | Leave a Comment »

महाराष्ट्र ग्रामपंचायत: कार्ये

Posted by संदीप नारायण शेळके on October 9, 2012


ग्रामपंचायत म्हणजे एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.

ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :

१. भूविकास
२. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
३. जमिनीचे एकत्रीकरण
४. मृदुसंधारण
५. लघु पाट बंधारे
६. सामाजिक वनीकरण
७. घर बांधणी
८. खादी ग्रामोद्योग
९. कुटिरोद्योग
१०. रस्ते, नाले, पूल
११. पिण्याचे पाणी
१२. दळण वळणाची इतर साधने
१३. ग्रामीण विद्युतीकरण
१४. अपारंपरिक उर्जा साधने
१५. दारिद्रय निर्मुलन
१६. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
१७. बाजार आणि जत्रा
१८. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
१९. महिला आणि बालविकास
२०. प्रौढ शिक्षण
२१. सांस्कृतिक कार्यक्रम
२२. सार्वजनिक वितरण
२३. उत्पादनाच्या बाबी

ग्रामपंचायतींची कार्ये:

१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन
२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे
३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास
५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा
६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने
७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे
८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे

जय भारत!

संबंधित लेख: महाराष्ट्र ग्रामपंचायत : स्वरूप

Posted in ग्रामपंचायत, Bharat, Gram Panchayat, Marathi, Politics | Tagged: , | Leave a Comment »

महाराष्ट्र ग्रामपंचायत : स्वरूप

Posted by संदीप नारायण शेळके on October 7, 2012


ग्रामपंचायत हा पंचायती राज चळवळीतील सर्वात महत्वाचा आणि मुलभूत घटक आहे. पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद ह्यांच्या यशस्वी कारभारासाठी सक्षम आणि सुदृढ ग्रामपंचायत हि पहिली पायरी आहे किंबहुना त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देशच आहे.

ग्रामपंचायतीचे स्वरूप:

ग्रामपंचायत म्हणून मान्यतेसाठी पठारी भागात किमान ५०० लोकसंख्या हवी तर डोंगरी भागात ३००.
ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या लोकसंखेनुसार ७-१७ पैकी कितीही असू शकते.

लोकसंख्या                  सदस्यसंख्या
——————–          ————–

५००-१५००                   ०७

१५०१-३०००                ०९
३००१-४५००                ११
४५०१-६०००                १३
६००१-७५००                १५
७५०१ हून अधिक           १७

ग्रामपंचायत सदस्यांची निवड हि सार्वत्रिक गुप्त मतदान पद्धतीने होते.
ग्रामपंचायतीचा कालावधी हा ५ वर्षांचा असून अविश्वास ठरवणे ग्रामपंचायत बरखास्त करता येते.
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर करण्यापूर्वी मतदार यादी आणि प्रभाग रचना निश्चिती प्रसिद्ध केली जाते.
एका प्रभागातून २/३ सदस्य निवडून येतात.
निवडणुकी नंतर जिल्हाधिकारी निवडलेल्या सदस्यांची नवे जाहीर करतात.

ग्रामपंचायत सदस्याच्या निवडणुकीसाठी अर्जदाराची अर्हता:

१. गावाचा रहिवासी असावा.
२. गावाच्या मतदार यादीत नाव असावे.
३. अर्जदाराचे वय २१ पूर्ण असावे.
४. आर्थिक दिवाळखोर नसावा.
५. वेडपट नसावा.
६. अस्पृश्यता कायद्याखाली दोषी नसावा.
७. सरकारी कर्मचारी नसावा.
८. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा.
९. रु. ५०० अनामत रक्कम भरावी लागेल.
१०. अर्जदारासाठी कसलीही शैक्षणिक पात्रता लागू नाही.

आणि अति महत्त्वाचा नियम म्हणजे “भारताचा(च) नागरिक असावा”

मतपत्रिकांचा रंग:

पांढरा            – सर्वसाधारण
फिकट पिवळा – मागासवर्गीय
फिकट हिरवा  – अनुसूचित जमाती
फिकट गुलाबी – अनुसूचित जाती-जमाती

जय भारत!

Posted in ग्रामपंचायत, Bharat, Gram Panchayat, Marathi, Politics | Tagged: , , , , | Leave a Comment »

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 418 other followers

%d bloggers like this: